हातनूर:-शशिकांत भोरे कोरोना विषाणूंचा संसर्ग रोखण्यासाठी खबरदारीचा उपाय म्हणून हातनूर ग्रामपंचायतीने विविध उपाययोजना हाती घेतल्या आहेत.हातनूर गावचे सरपंच,ग्रामसेवक, पोलीस पाटील सचिन भोसले, सामाजिक कार्यकर्ते विश्वास आण्णा पाटील, बाबुराव पाटील, सचिन पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली गावांमध्ये साफसफाई,स्वच्छता मोहीम व नीर्जंतुकीकरणासाठी औषध फवारणी सुरू केली आहे.
करोना विष्णूचा संसर्ग रोखण्यासाठी हातनूर गावात सोडियम क्लोराईडची फवारणी गावाभागात ,वाडया वस्त्यावर सुरू केली आहे.यामुळे विषाणूंच्या फैलावास मज्जाव होण्यास मदत होईल. नागरिकांनी या उपक्रमाचे कौतुक केले असुन संपूर्ण संचारबंदीसह मोठा प्रतिसाद मिळत आहे.या काळात ग्रामस्थ घरात राहणे पसंत करत आहेत.ग्रामस्थांनी घराबाहेर पडू नये यासाठी सरपंच,ग्रामसेवक, पोलीस पाटील, जागृत नागरिक सतर्क असुन तासगाव दूरक्षेत्राचे पोलिसाही संचारबंदी नियमांचे उल्लंघन करणाऱ्या वर कडक कारवाई करत आहेत.
0 Comments