नाशिकमध्ये कलाग्रामच्या माध्यमातून महिलांना कायमस्वरूपी विक्री केंद्र;-ना.छगन भुजबळ

नाशिक:-
            दिल्ली हाटच्या धर्तीवर नाशिकमध्ये कालाग्रामची निर्मिती करण्यात आली असून त्याच्या रखडलेल्या कामाला सुरुवात करण्यात आली आहे. पुढील दोन ते तीन महिन्यात कालाग्रामचे काम पूर्ण होणार असून बचतगटांच्या महिलांनी तयार केलेल्या मालाची विक्री होण्यासाठी कायमस्वरूपी विक्री केंद्र उपलब्ध करून देणार असल्याची माहिती राज्याचे अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री तथा नाशिक जिल्ह्याचे पालकमंत्री ना.छगन भुजबळ यांनी दिली.
             महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियानांतर्गत विभागीय आयुक्त कार्यालय व जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणा नाशिक, नाशिक विभागातील महिला स्वयंसहायता समूहांनी व ग्रामीण कारागिरांनी तयार केलेल्या वस्तूंचे भव्य विभागीय प्रदर्शन व विक्री महोत्सव गोदाईचे उदघाटन कार्यक्रम आणि बचत गट पुरस्कार वितरण सोहळा आज डोंगरे वसतीगृह मैदान येथे हस्ते पार पडले. त्यावेळी ते बोलत होते.
              यावेळी नाशिक जिल्हा परिषदेचे अध्यक्ष ना. बाळासाहेब क्षीरसागर, आमदार सरोज आहिरे, मुख्य कार्यकारी अधिकारी लीना बनसोड, जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणा प्रकल्प अधिकारी उज्वला बावके, उपायुक्त विकास मोरे, प्रतिभा संगमनेरे यांच्यासह अधिकारी उपस्थित होते.
             यावेळी ना.छगन भुजबळ म्हणाले की, नाशिकमध्ये दिल्ली हाटच्या धर्तीवर कालाग्रामची निर्मिती केली असून आघाडी सरकारच्या काळात त्याचे ९५ टक्के काम पूर्ण झाले होते.मात्र गेल्या पाच वर्षात ते काम रखडले होते.ते काम आपण सुरू करत असून महिलांना शंभर हुन अधिक स्टॉल उपलब्ध करून देण्यात येत असून महिलांना कायमस्वरूपी विक्री केंद्र उपलब्द करून देण्यात आहे. या मध्ये महिला बचतगटाना यामध्ये प्राधान्य देण्यात येईल. हा महाराष्ट्रातील हा पहिला प्रकल्प आपण नाशिक मध्ये करत होत आहे. यातून नाशिकच्या उत्पादनांना देशभरात आपण पोहचवू असे त्यांनी सांगितले.
                ते म्हणाले, माता जिजाऊ आणि सावित्रीबाई फुले यांनी त्या काळात अनेक अडचणींचा सामना करून महिलांना समाजात महत्वाचे स्थान मिळवून दिले. त्यामुळे सर्वच क्षेत्रात महिलांनी प्रगती साधली आहे.या दोनही हिंमतवान महिलांचे विचारांची जोपासना करून महिलांनी उभं रहावे. त्यामुळे महिलांनी येणाऱ्या अडचणींचा सामना करावा असे सांगत  बचतगट महिलांची एक महत्वाची शक्ती असून हा कार्यक्रम महिलांना शक्ती देणारा असल्याचे त्यांनी सांगितले.