अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांचं कर्ज माफ; उद्धव ठाकरेंचा मोठा निर्णय


मुंबई:
          शेतकऱ्यांचं जुलै ते ऑगस्ट 2019 मध्ये अतिवृष्टी आणि पुरामुळे पीकांचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालं होतं. याच पार्श्वभूमीवर मा. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी मोठा निर्णय घेतला आहे.
           अतिवृष्टी आणि पुरामुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांचं पीक कर्ज माफ होणार आहे. ठाकरे सरकारने हा निर्णय घेऊन पीडित शेतकऱ्यांना मोठा दिलासा दिला आहे. त्यामुळे शेतकरी वर्गात आनंदाचं वातावरण निर्माण झाले आहे.
           मागील जुलै ते ऑगस्ट 2019 राज्यात अवकाळी पाऊस झाला होता. या पावसामध्ये शेतकऱ्यांचं मोठ्यां प्रमाणात नुकसान झालं होतं. हातातोंडाशी आलेलं पीक डोळ्यादेखत पाण्यात गेलं होतं. त्याच शेतकऱ्यांना सरकारने मोठा दिलासा दिला आहे.
        दरम्यान, उद्धव ठाकरेंनी काल राज्यातील सर्व शेतकऱ्यांना मोठं गिफ्ट दिलं आहे. या निर्णयाचं सर्वत्र कौतूक होत आहे.