शेतात स्वत: राबणारे खासदार श्रीनिवास पाटील
सातारा:सूरज घोलप
सिक्कीमचे माजी राज्यपाल व सातारा चे खासदार श्रीनिवास पाटील हे कतृत्ववान व्यक्तिमत्व प्रत्येकाची काळजी घेणार नेतृत्व.....
खासदार साहेब आजही यावयातही प्रत्यक्ष स्वता शेतीत काम करतात.
शेतातली शेतकऱ्याच्या मनात खोलवर उतरुन सतत संवाद साधत असते. कृषीसंस्कृतीची मुळं आपल्या मनात ही अशी घट्ट खोलवर रुजलेली आहेत, ती यामुळेच. मी शेतातच राहत असल्याने ते सांगतात.
शेताची ही हाक मला सतत कानी येत असते. शेतात दिवसातून एकदा तरी फेरफटका मारल्याशिवाय दिनक्रम पुर्ण होत नाही. सध्या देशावर ओढावलेलं कोरोना विषाणूचं संकट मोठं आहे. अशावेळी शेती व शेतकऱ्यांचं महत्त्व अधिक प्रकर्षाने कळतंय. कारखाने, मोठमोठी ऑफीसेस असं सगळं इथून तिथपर्यंत बंद आहे. उद्योजक, कामगार, गरीब, श्रीमंत असे सर्वजण घरातच आहेत. या काळात हा जगाचा पोशींदा आज सर्वांचा खऱ्या अर्थाने तारणहार झालाय. या कठीण काळात देखील आपण उपाशीपोटी नाही याचे श्रेय सर्वस्वी शेतकरी बांधवांचं आहे. एकीकडे वैद्यकीय व पोलीस यंत्रणा कोरोनाशी लढत असताना दुसरी बाजू बळीराजाने आपल्या मजबूत खांद्यावर टिकवून ठेवली आहे. म्हणूनच आपण शेती,माती आणि शेतकरी बंधू भगिनींप्रती कृतज्ञ असायलाच हवं. असे खासदार श्रीनिवास पाटील सांगतात.
बळीराजाला शतशः वंदन
#घरी_रहा_सुरक्षित_रहा
0 Comments